Sunday, January 2, 2011

भावनांच्या किनार्याला कधी अंत नसतो

भावनांच्या किनार्याला कधी अंत नसतो

अपेक्षेच्या डोहात सतत मन बुडत असत

माहिती नाही नकळत आजही डोळे पाणावतात

वाटेने जाताना आजही पाय अड्खळतात


नकोश्या असणार्या गोष्टी आजही मधे येतात
वाटेत येउन उगाच वाट हरवतात


पुन्हा पुन्हा मनं अड़खळलेली वाट शोधून काढत
आकाशाच्या दिशेने भरधाव वेगाने धावत

पक्षाचे पंख कापावे तसा आयुष्यावर वार होतो
तरी पण आयुष्य वाट शोधत असतो
कारण भावनांच्या किनार्याला कधी अंत नसतो